पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व विकास प्रकल्पांना गती द्या–

Date:

Share post:

          *....पालकमंत्री गणेश नाईक*

पी.वी.आनंदपद्मनाभन

मुंबई
पालघर जिल्ह्यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालय, नॅशनल हायस्पिड रेल कार्पोरेशन व मुंबई रेल्वे विकास महामंडळ आदी विविध यंत्रणांकडून राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांचा वन मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी आढावा घेतला. पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी हे सर्व प्रकल्प महत्त्वाचे असून या प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात यावी. यासाठी वन विभाग व जिल्हा प्रशासनाकडून सर्व सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच पालघर जिल्ह्याचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी आग्रही भूमिका मांडली होती. त्या पार्श्वभूमीवर वन मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री श्री. नाईक यांनी सह्याद्री अतिथीगृहात आढावा बैठक घेतली. त्यावेळी वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक तथा वन बल प्रमुख शोमिता बिश्वास, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास राव, श्री. रामाराव, मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुद्गल, पालघरच्या जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, वसई विरार महापालिका आयुक्त अनिल पवार, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक नरेश झिरमुरे, उपसचिव विवेक होशिंग आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी विविध यंत्रणांनी पालघर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. यामध्ये सुर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, बाह्यरस्ते विकास योजना, पालघर जिल्ह्यातील विकासकामे, सफाळे/केळवा/माहिम विकास केंद्रे, पालघर विक्रमगड मार्गे समृद्धी महामार्गाला जोडणारा रस्ता, विरार अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉर, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, एमयूटीपी ३ अंतर्गत करण्यात येणारे रेल्वेची कामे आदींचा समावेश होता.

वाढवण बंदर, समृद्धी महामार्ग व बुलेट ट्रेन अशा प्रकल्पांमुळे पालघर जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणार आहे. याबरोबरच इतरही प्रकल्प जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या प्रकल्पांना वन मंत्री म्हणून तसेच जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार असल्याचे श्री. नाईक यांनी यावेळी सांगितले.

Related articles

बाजार पर लौटा निवेशकों का भरोसा; सेंसेक्स ने लगाई 1000 अंकों की छलांग, निफ्टी 25000 के पार

Sensex-Nifty Closing Bell: शुक्रवार को 30 शेयरों वाला बीएसई सेंसेक्स 1046.30 अंक उछलकर 82,408.17 अंक पर बंद हुआ।...

Maharashtra Politics: महाराष्ट्र में हिंदी को लेकर फिर क्यों बढ़ा विवाद? समझिए BMC चुनाव से पहले बीजेपी के लिए क्या होंगी मुश्किलें

Maharashtra Politics: हिंदी को लेकर महाराष्ट्र सरकार के नए आदेश के भाषाई टकराव के चलते सियासी पारा फिर...

🎬 RLG PRODUCTION प्रस्तुत करता है🗣️ Motivational Speech by: Rajesh Laxman Gavade🎞️ एक सोचने पर मजबूर कर देने वाला संदेश📢 शीर्षक: “शब्दों की ताक़त...

राजेश लक्ष्मण गावड़े मुख्य संपादक (जन कल्याण टाइम) "मन खराब हो तो शब्द खराब मत करो,क्योंकि मन तो...

🎬 RLG PRODUCTION प्रस्तुत करता हैदिनांक: 20 जून 2025🌞 GOOD MORNING | सुप्रभात, प्यारे दर्शकों!🎙️ Motivational Speech by: Rajesh Laxman Gavade🎞️ शीर्षक: “जवानी लौट...

राजेश लक्ष्मण गावड़े मुख्य संपादक (जन कल्याण टाइम) 🗣️ प्रेरणादायक संवाद: "घूम लिया करो, EMI पर लोन मिलता है...