Close Menu
    What's Hot

    📰✨ जन कल्याण टाइम्स न्यूज़ – विशेष रिपोर्ट ✨📰🌟 माहीम वेस्ट में ‘MARINA 16’ का भव्य भूमि पूजन संपन्न 🌟📍 माहीम वेस्ट, Mumbai

    April 6, 2026

    📰✨ जन कल्याण टाइम्स न्यूज़ – विशेष रिपोर्ट ✨📰🌟 नवसारी की शान: विस्पी कसाद जी की मेहनत से साकार हुआ रामली मासी का घर 🌟📍 दशहरा टेकरी, नवसारी (गुजरात)

    April 6, 2026

    🌼✨ “श्रद्धा और सबूरी का दिव्य संदेश” ✨🌼जन कल्याण टाइम न्यूज़, मुंबई के माध्यम से बॉलीवुड लेखक-निर्देशक Rajesh Bhatt साहब की कलम से प्रस्तुति: धनंजय राजेश गावड़े (प्रेस फोटोग्राफर)

    April 6, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    jankalyan time
    Facebook X (Twitter) Instagram
    jankalyan time
    Home»Mumbai Maharashtra»विकसित महाराष्ट्र साकारणारा, लोकाभिमुख अर्थसंकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
    Mumbai Maharashtra

    विकसित महाराष्ट्र साकारणारा, लोकाभिमुख अर्थसंकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    जनकल्याण टाइमBy जनकल्याण टाइमMarch 10, 2025Updated:March 10, 2025No Comments4 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Telegram Copy Link
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

    पी.वी.आनंदपद्मनाभन

    मुंबई,
    विकसित भारतासोबतच, विकसित महाराष्ट्राचा संकल्प साकार करणारा, लोकाभिमुख असा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात शेती, उद्योग, पायाभूत सुविधांबरोबरच रोजगार आणि सामाजिक विकास अशी पंचसुत्री आहे. संतुलित अशा या अर्थसंकल्पाला अनुसरून आमची पुढील वाटचाल, असेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

    उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी विधान सभेत सन २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. पत्रकार परिषदेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री श्री. पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल उपस्थित होते.

    राज्याचा हा अर्थसंकल्प संतुलित स्वरुपाचा आहे. यात राजकोषीय तूट २.७ टक्क्यांपर्यंत राखण्यात यश आले आहे. सरत्या वर्षात ही तूट २.९ टक्क्यांपर्यंत होती. महसुली जमा आणि खर्च यांचा उत्तम ताळमेळ राखला गेला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पाचे आकारमान आता सात लाख कोटींवर पोहचले आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे आता लोकसंख्येच्य तुलनेत उत्तर प्रदेशचा अपवाद केल्यास, सर्वात मोठा अर्थसंकल्प असणारे राज्य ठरले आहे. महाराष्ट्राची जीएसडीपी (सकल राज्य घरेलू उत्पादन) वाढ चांगली आहे. गेल्या दहा वर्षात हे प्रमाण ७.५ टक्क्यांवर पोहचले आहे. हे उत्पादन पाच ते दहा लाख कोटींनी वाढले आहे. त्यामुळे या प्रमाणात आपली कर्ज घेण्याची मर्यादाही वाढली आहे. त्यामुळे आपण विहीत कर्ज मर्यादेचे उल्लंघन केलेले नाही, हे देखील उल्लेखनीय आहे.

    आपल्या उद्योग क्षेत्रानेही भरारी घेतली आहे. कोविड काळाचा अपवाद वगळल्यास हा वाढीचा दर चांगला आहे. आपले राज्य स्टार्टअपमध्ये क्रमांक एकवर आहे. जीसएसटी कर संकलनातही महाराष्ट्र पुढे आहे. राष्ट्रीय कर संकलनाच्या तुलनेत आपण सात टक्क्यांहून अधिक म्हणजे दिड लाख कोटींच्या पुढे आहोत. इतर राज्ये आपल्या मागे आहेत. औद्योगिक वाढ, विदेशी गूंतवणूक आणि स्टार्टअप आणि जीएसटी मुळे महाराष्ट्र यापुढेही अग्रेसर राहील, हा विश्वास आहे.
    राज्यातील पायाभूत सुविधांमध्ये रस्ते विकास हा महत्वाचा विषय आहे. आपल्या अर्थसंकल्पात रस्त्यांचा विकास हा पुढील वीस वर्षांचा विचार करून, नियोजनबद्धरित्या करण्यावर भर दिला गेला आहे. यामुळे रस्त्यांचा आराखडा गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत एक समान पद्धतीने होणार आहे. या पायाभूत सुविधांच्या कामांसाठी आपण बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून निधी उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. वर्ल्ड बँक, एशियन बँक, न्यु डेव्हलपमेंट बँक आणि नाबार्डच्या माध्यमातून रस्त्यांचे जाळे उभरले जात आहे. यामुळे आपल्या राज्यात बंदरे, विमानतळांच्या विकासासाठीही मोठी गुंतवणूक येणार आहे.
    महाराष्ट्राने घर बांधणीच्या क्षेत्रात मोठी मजल गाठली आहे. या क्षेत्रातही मोठी गूंतवणूक आली आहे. विशेषतः प्रधानमंत्री आवास योजनेतून आपण आता वीस लाख घरांचा टप्पा गाठत आहोत. यातही केंद्र आणि राज्य यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधीचा ओघ राहणार आहे. यातील घरांना प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून वीजेसाठी स्वयंपूर्ण केले जाणार आहे. याशिवाय ज्या घरांचा वीज वापर तीनशे युनीटहून कमी असेल, त्यांनाही या योजनेतून वीज देण्याचे सुतोवाच आजच्या अर्थसंकल्पात केली गेली आहे.
    या अर्थसंकल्पात कृत्रिम बृद्धिमता- एआय आणि बायोटेक, ड्रोन टेक्नॉलॉजी सारख्या उत्पादन खर्च कमी करणाऱ्या आणि शेतीतील नफा वाढवणाऱ्या गोष्टींवर भर देण्यात आला आहे. एआयद्वारे माती परिक्षण ते फुल-फलधारणा यापर्यंतच्या टप्प्यांचे नियोजन करता येणारे शक्य आहे. त्याबाबतचे नियोजनही केले गेले आहे. जलयुक्त शिवार टप्पा दोन आणि नदिजोड प्रकल्पासाठी भरीव तरतुद केली गेली आहे.
    लाडक्या बहिणींसाठी निधी कमी पडणार नाही, असे नियोजन केले गेले आहे. याशिवाय या योजनेतून बहिणी आर्थिक स्वावलंबी व्हावेत असे नियोजन आहे. काही बहिणींनी या पंधराशे रुपयांतून सोसायटी स्थापन केल्या. या सोसायट्यांचे जाळे निर्माण करून, राज्यस्तरीय अपेक्स अशी सोसायटी स्थापन केली जाईल. याशिवाय आपल्याला लखपती दीदी या महिलांच्या स्वयंरोजगाराच्या संकल्पनेलाही पुढे न्यायचे आहे. आतापर्यंत आपण २३ लाख लखपती दीदींचे उद्दीष्ट पूर्ण केले आहे. आणखी २४ लाखांचे उद्दीष्ट्य साध्य करून एक कोटी लखपती दीदींचे लक्ष्य गाठायचे आहे.
    सामाजिक न्याय, आदिवासी विभागांच्या तरतूदीत भरीव वाढ करण्यात आली असून ती प्रत्येकी 43 व 40 टक्के एवढी आहे. सामाजिक न्यायाच्या धोरणाला बळ मिळेल. यात वैयक्तीक लाभाच्या योजना राबवल्या जाणार असल्यामुळे अनेक कुटुंबांना शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यासंदर्भातील लाभ निश्चितच होतील.
    विकासाकडे जाताना रोजगार संधीवर भर देणारा अर्थसंकल्प आहे. यापुर्वी अर्थमंत्री म्हणून १३ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम दिवंगत शेषराव वानखेडे यांच्या नावावर होता. वित्त मंत्री श्री. पवार यांनी अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. यापुढील वाटचालीत ते देखील हा विक्रम पूर्ण करून, अर्थसंकल्प सादर करतील, असा विश्वास आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नमूद करून वित्त मंत्री श्री. पवार आणि वित्त राज्यमंत्री श्री. जयस्वाल यांचे अभिनंदन केले.

    https://www.instagram.com/reel/DFHv4rcoAbG/?igsh=MWtrM3JxNjJ6N2U5dw==

    Follow on Google News Follow on Flipboard
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous ArticleIIFA डिजिटल अवॉर्ड्स में TVF का जलवा! पंचायत 3 और कोटा फैक्ट्री 3 ने मारी बाजी!
    Next Article ऑटो उद्योग में और क्या सुधार की आवश्यकता है?
    जनकल्याण टाइम

    Related Posts

    📰✨ जन कल्याण टाइम्स न्यूज़ – विशेष रिपोर्ट ✨📰🌟 माहीम वेस्ट में ‘MARINA 16’ का भव्य भूमि पूजन संपन्न 🌟📍 माहीम वेस्ट, Mumbai

    April 6, 2026

    🛑 जन कल्याण टाइम न्यूज़ मुंबई⚠️ विशेष रिपोर्ट: सोशल मीडिया का खूंखार जाल!🚨 4 लड़कियों समेत 6 सदस्यों के गिरोह ने इंस्टाग्राम पर फंसाकर किया अपहरण, गैंगरेप और 50 लाख की फिरौती की मांग – उज्जैन पुलिस ने पूरे गिरोह को दबोचा📍 मुंबई | दिनांक: 29 मार्च 2026 (जन कल्याण टाइम न्यूज़ मुंबई से विशेष संवाददाता)

    March 29, 2026

    🚨 अंधेरी वेस्ट रेलवे स्टेशन की हकीकत – जनता की आवाज 🚨

    March 21, 2026

    📰 जन कल्याण टाइम्स न्यूज़, मुंबई विशेष प्रस्तुति | आध्यात्मिक ऊर्जा के साथ नई शुरुआत 🎬 RLG PRODUCTION के निर्माता राजेश लक्ष्मण गावड़े जी पहुंचे सिद्धिविनायक मंदिर

    March 18, 2026

    🛑 हेडलाइन (मुख्य समाचार):Taj Lands End में RLG PRODUCTION के निर्माता राजेश लक्ष्मण गावड़े जी की बड़ी मीटिंग – Upcoming Project पर हुई खास चर्चा जन कल्याण टाइम न्यूज़, मुंबई विशेष रिपोर्ट – धनंजय राजेश गावड़े

    March 17, 2026

    🌏✨ शंघाई से खास संदेश – बॉलीवुड राइटर डायरेक्टर राजेश भट्ट का चीन दौरा

    February 27, 2026
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    Economy News

    📰✨ जन कल्याण टाइम्स न्यूज़ – विशेष रिपोर्ट ✨📰🌟 माहीम वेस्ट में ‘MARINA 16’ का भव्य भूमि पूजन संपन्न 🌟📍 माहीम वेस्ट, Mumbai

    By जनकल्याण टाइमApril 6, 2026

    मुम्बई से एक बेहद शुभ और गौरवपूर्ण समाचार सामने आया है, जहाँ कल ‘MARINA 16’…

    📰✨ जन कल्याण टाइम्स न्यूज़ – विशेष रिपोर्ट ✨📰🌟 नवसारी की शान: विस्पी कसाद जी की मेहनत से साकार हुआ रामली मासी का घर 🌟📍 दशहरा टेकरी, नवसारी (गुजरात)

    April 6, 2026

    🌼✨ “श्रद्धा और सबूरी का दिव्य संदेश” ✨🌼जन कल्याण टाइम न्यूज़, मुंबई के माध्यम से बॉलीवुड लेखक-निर्देशक Rajesh Bhatt साहब की कलम से प्रस्तुति: धनंजय राजेश गावड़े (प्रेस फोटोग्राफर)

    April 6, 2026
    Top Trending

    📰✨ जन कल्याण टाइम्स न्यूज़ – विशेष रिपोर्ट ✨📰🌟 माहीम वेस्ट में ‘MARINA 16’ का भव्य भूमि पूजन संपन्न 🌟📍 माहीम वेस्ट, Mumbai

    By जनकल्याण टाइमApril 6, 2026

    मुम्बई से एक बेहद शुभ और गौरवपूर्ण समाचार सामने आया है, जहाँ…

    📰✨ जन कल्याण टाइम्स न्यूज़ – विशेष रिपोर्ट ✨📰🌟 नवसारी की शान: विस्पी कसाद जी की मेहनत से साकार हुआ रामली मासी का घर 🌟📍 दशहरा टेकरी, नवसारी (गुजरात)

    By जनकल्याण टाइमApril 6, 2026

    नवसारी, गुजरात से एक बेहद प्रेरणादायक और दिल को छू लेने वाली…

    🌼✨ “श्रद्धा और सबूरी का दिव्य संदेश” ✨🌼जन कल्याण टाइम न्यूज़, मुंबई के माध्यम से बॉलीवुड लेखक-निर्देशक Rajesh Bhatt साहब की कलम से प्रस्तुति: धनंजय राजेश गावड़े (प्रेस फोटोग्राफर)

    By जनकल्याण टाइमApril 6, 2026

    🕉️ यह दिव्य चित्र हमें Sai Baba of Shirdi के उस पवित्र…

    Subscribe to News

    Get the latest sports news from NewsSite about world, sports and politics.

    Advertisement
    Demo
    Facebook X (Twitter) Pinterest Vimeo WhatsApp TikTok Instagram

    News

    • World
    • US Politics
    • EU Politics
    • Business
    • Opinions
    • Connections
    • Science

    Company

    • Information
    • Advertising
    • Classified Ads
    • Contact Info
    • Do Not Sell Data
    • GDPR Policy
    • Media Kits

    Services

    • Subscriptions
    • Customer Support
    • Bulk Packages
    • Newsletters
    • Sponsored News
    • Work With Us

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Privacy Policy
    • Terms
    • Accessibility

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.